जामनेर(पंढरीनाथ पाटील):- तालुक्यातील बळीराजावर कधी निसर्ग रूसतो तर कधी कोपतो.असे गेल्या तिन वर्षांपासून सतत सुरू आहे. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. अशा विवंचनेत सापडलेल्या जगाच्या पोशिंद्याने दाद मागावी कुणाला. तालुक्यात सतत सूरू आसलेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला असून हता तोंडाशी आलेले सोयाबीन, मका, कापूस ह्या नगदी पिकांना अक्षरशः फुटवे फुटले असून पांढरे सोने म्हणून बघीतले जाणारे कापसाचे पिक मातीत मिसळून त्याची किंमत घसरली आहे. एक तर बळी राजाला कर्ज काढून महागडी बी बियाणे खरेदी करावी लागली. वरतून पिकांची ४ महिने आपल्या मुलाप्रमाणे जपवणूक केली. त्या साठी लागणारे कीटक नाशक, मटेरियल उधारीवर घेऊन व निंदनी व खुरपणी करुण पिकांचे संगोपन केले. मात्र येवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झाला असताना बळीराजाच्या मागे निसर्ग हात धुवून लागला असून शेतकऱ्यांच्या हातात २५ ते ३० टक्के उत्पन्न लागणार आहे. अशाही परिस्थितीत त्यांच्या हाती आलेल्या शेतमालाला पाहिजे तसा रास्त भाव मिळत नाही. शासनाने गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाई पोटी पीक विमा धारकांना काही प्रमाणात दीलासा देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र ही मदत तुटपुंजी ठरत आहे. आणी या पिक विम्यापासून सुद्धा काही शेतकरी वंचीत राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यातल्या त्यात आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून नेते मंडळी आपापल्या मतदासंघांत प्रचाराच्या रणधुमाळीत मशगुल असल्याने बळीराजावर निसर्गाच्या अवकृपेचे ओढवलेले संकट दूर करण्यासाठी कोणीही पुढे येतांना दिसत नाही. तालुकास्तरावरील महसूल विभाग सुद्धा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रीतसर पंचनामे करण्यास त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे बळीराजा हतबल झाला असून डोक्यावर झालेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत दिसून येत आहे. एकंदरीतच बळीराजा मोठ्या संकटात सापडला असल्याने त्यांच्या मदतीला धाऊन जाणार कोन? हा गहन प्रश्न बळीराजाला सतावत आहे.

+ There are no comments
Add yours