पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
७ जानेवारीला आझाद मैदानावर सरपंच परिषदेचा एल्गार, दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली होणार एक दिवसीय धरणे आंदोलन.
जामनेर (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाल्याने महाराष्ट्राला हादरा बसला आहे. या घटननेमुळे भारतात संविधानिक पद्धतीने नांदणाऱ्या लोकशाही ची हत्या झाल्याचे दिसून येते.सदर घटना लोकशाहीला काळिमा फासणारी ठरली आहे. ही हत्या कोणत्याही जाती किंवा धर्मासंबंधी नसून, एक पंचायत राज व्यवस्थेतील महत्त्वाच्या स्वरूपाचा अंत करणारी आहे.

या गंभीर घटनेचा निषेध करण्यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आणि सदस्यांनी दी.७ जानेवारी रोजी सकाळी आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राजमल भागवत संचालक तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जामनेर, तसेच लोकनियुक्त सरपंच लोंढरी ता.जामनेर आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई यांनी केले आहे.या आंदोलनाद्वारे लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचे तसेच दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
+ There are no comments
Add yours