*अखेर मंत्र्यांना मिळाले खाते, गिरीश भाऊ पुन्हा जलसंपदा मंत्रीपदी विराजमान.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

अखेर गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच

जामनेर  – ३३कॅबीनेट मंत्री व ६ राज्यमंत्री यांना मिळालेले खाते असे १)चंद्रशेखर बावनकुळे – महसूल २)राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)३)हसन मुश्रीफ –  वैद्यकीय शिक्षण ४)चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री ५)गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन ६)गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा ७)गणेश नाईक –  वन ८)दादाजी भुसे – शालेय शिक्षण ९).संजय राठोड – माती व पाणी परीक्षण १०)धनंजय मुंडे  – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण ११)मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन १२)उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा १३)जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल १४)पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन १५)अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर १६)अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय १७)शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय१८)आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान १९)दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय २०)अदिती तटकरे – महिला व बालविकास २१)शिवेंद्रराजे भोसले –  सार्वजनिक बांधकाम २२)माणिकराव कोकाटे – कृषी २३)जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज २४)नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन २५)संजय सावकारे – कापड२६)संजय शिरसाट – सामाजिक न्याय २७)प्रताप सरनाईक – वाहतूक २८)भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन २९)मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन ३०)नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे ३१)आकाश फुंडकर – कामगार ३२)बाबासाहेब पाटील – सहकार ३३)प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

                        राज्यमंत्री (६)

१) माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण २) आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय ३) मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा ४) इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन ५) योगेश कदम  – गृहराज्य शहर ६)पंकज भोयर – गृहनिर्माण अशा प्रकारचे खाते वाटप झाले असून गिरीश भाऊंना पुन्हा जलसंपदा विभाग मिळाल्याने जामनेर तालुक्यातील राहीलेले सिंचनाचे प्रश्न मार्गी लागणार असून शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच तापीचे पाणी जामनेर तालुक्यात लवकरच पोहचणार असल्याच्या भावना तालुक्यातून सुज्ञ नागरिक व्यक्त करतांना दिसून येत आहेत.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours