पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
तहसीलदार यांना निवेदन सादर
जामनेर – संविधानाची विटंबना झाल्याप्रकरणी परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निषेध आंदोलन केले होते. यामध्ये पोलीसांनी बळाचा वापर करून आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करून त्यांना अटक करण्यात आली होती.यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी या तरूण भिमसैनीकाचा समावेश होता. पोलीस कस्टडीमध्ये असतांना पोलीसांच्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा मृत्यु झाला.यात जे पोलीस अधिकारी सामील असतील त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी.व विटंबने मागील खऱ्या सुत्रधाराला शोधून त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे.

या बाबींचा निषेध करण्यासाठी दि.१९ गुरूवार रोजी दु.१ वाजता डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक, जामनेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातील मागण्या मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच शासनाकडे पाठवण्यात येतील असे आश्वासन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी यावेळी मोर्चाकरांना दिले.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा संतप्त भावना व्यक्त करीत जाहीर निषेध केला.या वेळी आर.पी.आय.जिल्हाअध्यक्ष भगवान सोनवणे, शहर अध्यक्ष बबलु लोखंडे, सुपडू मेढे, यादव सुरवाडे, प्रदीप इंगळे ,मोहन दामोदर, अलोसर तडवी, अर्जुन रामोसे, धनराज सोनवणे, संपत दामोदर ,गजमल रामोसे, पंडित शिंदे, सुनंदा सुरवाडे, कल्पना सुरवाडे, अनिता सुरवाडे, राजू सुरवाडे, महेश खरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व डॉ.बाबसाहेब आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours