*जामनेर विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर होणार?*

 

जामनेर (पंढरीनाथ पाटील):- होऊ घातलेल्या जामनेर विधानसभेच्या निवडणुकीत कोण कोणावर भारी, लढाईत कोन जिंकणार, येथे काट्याची टक्कर होणार का? का निवडणूक एकतर्फी होणार? हे तालुक्यातील जनतेला पडलेले प्रश्न याचा थोडक्यात घेतलेला आढावा.येथे महायुतीचे भाजपचे उमेदवार नामदार, आमदार मंत्री असलेले गिरीश भाऊ महाजन यांनी गेल्या ३० वर्षापासून आपली पकड मतदार संघावर अबाधीत ठेवली असून ते आता ७ व्यांदा उमेदवारी करीत असल्याने त्यांचा मतदार संघावर प्रभाव असल्याचा दिसून येतो. तर महाविकास आघाडीच्या वतीने पूर्वश्रमीचे भाजपचेच असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गळाला लावल्यामुळे त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे . संजय दादा गरूड यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठा हादरा बसला होता.मात्र याही परिस्थतीत पक्षाने उभारी घेत लोकसभेला याची चुणूक दाखवून दिली आहे. संजय दादा यांचे बंधू प्रविण गरूड हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच असल्याचे व आपण भाजप मध्ये प्रवेश केला नसल्याचे त्यांनी सांगितले असून नुकतीच त्यांनी शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांची भेट घेतली आहे .दिलीप खोडपे सरांना निवडून आणणारच असे अभिवचन प्रविण गरुड यांनी दिलेले आहे.ही सरांची जमेची बाजू असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.याच पार्श्वभूमीवर दी.५ रोजी शेंदुर्णी येथे महाविकास आघाडीच्या वतीने रोहीत पवार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.खोडपे सरांना तालुक्यांतील जनतेचा अभ्यास असल्याने तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. या सोबतच अनेक उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यात प्रामुख्याने बहुजन मुक्ती पार्टीचे अपक्ष अर्ज दाखल केलेले राजू खरे, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेले पूर्वश्रमीचे संभाजी ब्रिगेड चे प्रभाकर साळवे हे महाविकास आघाडीच्या उमेदवरासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

जामनेर विधानसभे साठी एकूण २२ उमेदारांचे अर्ज वैध असून ४ तारखेला किती उमेदवार माघार घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

या मतदार संघात खरी लढत महायुती कडून भाजपचे गिरीश भाऊ महाजन व महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खोडपे सर यांच्या मध्येच होणार आहे. भाजप चे तालुक्यासह गाव खेड्यात बूथ लेव्हल पासून मोठी यंत्रणा सक्रीय असल्याने कार्यकर्ते स्वयंस्पूर्तीने तालुक्यात गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहेत.तसेच त्यांनी केलेला तालुक्याचा विकास आणि महायुतीच्या माध्यमातुन आणलेल्या विविध योजनांमुळे महाजन यांनी आपण १ लाखाच्या वर मताधिक्याने निवडून येणार असल्याचे भाकीत केले आहे.महायुतीने आणलेल्या विविध योजनांची माहिती मतदारांना देतांना कार्यकर्ते दिसून येत आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या सोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असले तरी नियोजनात सू – सुत्रता असल्याचा अभाव दिसून येतो. अजुनही राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसून येत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उघड बोलतांना दिसून येत असल्यामुळे खोडपे सरांना निवडणूक सोपी नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

अजून उमेदवाराला निवडणूक चिन्ह मिळणे बाकी असले तरी सर्वानाच माहीत आहे प्रमूख पक्षाच्या उमेदवाराला कोणते चिन्ह मिळणार आहे ते. त्यामुळे मतदार संघात आज तरी गिरीश भाऊ महाजन यांनीच प्रचारात आघाडी घेतली आहे.

गिरीश महाजन हे गेल्या ३० वर्षापासून जामनेर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने ते त्यांनी तालुक्यात केलेल्या विकासाच्या मुद्यावर मत मागतांना दिसून येत आहेत. तर खोडपे सर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ,शेतकरी व त्यांच्या मालाचे पडलेले बाजार भाव, प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी, एम आय डी सी चा मुद्दा, कापसाच्या आयात केलेल्या गठांनी मुळे कापसाचे भाव न वाढण्याची शास्वती, आणि गावा गावात पडलेले दोन गट यासह स्थानीक मुद्दे या मुद्द्यांच्या आधारे मत मागत असल्याचे दिसून येत आहेत. ही निवडणूक गिरीश भाऊ महाजन व दिलीप खोडपे सर या उमेदवारांची अस्तित्वाची लढाई ठरू शकते. त्यामुळे दोघांमध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours