जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कुंभारी येथील रहिवाशी व जगात भारी कुंभारी या पर्यटन स्थळाचे संचालक ग्रामपंचायत सदस्य ,संभाजी ब्रिगेडचे जळगांव जिल्हा अध्यक्ष पद भूषवलेले ,उद्योजक प्रभाकर पंढरी साळवे यांनी जामनेर विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी घेतली असून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला देता आला नाही. असा वचननामा प्रसिद्ध केला आहे. या अगोदर प्रभाकर साळवे यांनी फत्तेपूर गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवली असून त्यावेळेस त्यांना गणातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता प्रभाकर साळवे हे जामनेर विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी करीत असून त्याचा अंनूक्रमांक ५ असून त्यांची निशाणी ‘शिट्टी’ आहे.त्यांनी सादर केलेल्या वचन नाम्याची मात्र तालुक्यात जोरदार चर्चा होतांना दिसून येत आहे. त्यांनी सादर केलेल्या वचननामा असा १)तालुक्यात एक लाख एक हजार उद्योजक निर्माण करणार२)जामनेर तालुक्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठे आयात निर्यात केंद्र बनवणार ३)प्रत्येक गावात ५०० म्हशींचा प्रकल्प देणार आणि प्रत्येक गणात एक दूध डेअरी स्थापन करणार ४)प्रत्येक गावात शेतमाल प्रक्रिया उद्योग स्थापन करणार आणि प्रत्येक गावात एटीएम बसवणार ५)तालुक्यात भव्य दिव्य मोफत निसर्गोपचार केंद्र चालू करणार आणि गावागावात निसर्गोपचार पोहचवणार ६) मागेल त्याला रोजगार मागेल त्याला उद्योग धोरण राबवणार ७) कृषी पर्यटन धोरण राबवणार. ‘आई’ योजना आणि इतर योजना अंतर्गत गावाला पर्यटन दर्जा निर्माण करून प्रत्येक गावात तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार ८) ‘बेस्ट व्हिलेज’ योजना राबवणार ज्यामुळे प्रत्येक गावात पर्यटक येतील आणि गावाला रोजगार मिळेल ९) विविध प्रकारचे महोत्सव व कृषी प्रदर्शन भरवणार ज्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर पिके आणि माहिती मिळेल आणि तालुक्याचे नाव संपूर्ण देशात होईल १०) प्रत्येक गाव हे मधाचे गाव म्हणून निर्माण करणार ज्यामुळे जगात तिसरा उद्योग मधाचा उद्योग म्हणून ओळखला जाईल. जामनेर तालुक्याची ओळख ‘मधाचा तालुका’ म्हणून असेल.११) महिला बचत गट अंतर्गत विविध योजना समाविष्ट करून त्यांना आर्थिक साक्षरता कौशल्यविकास व उद्योगउद्यम प्रोत्साहन देणार.१२) गोधडी प्रशिक्षण विणकाम आणि हातकाम यावर विशेष भर देऊन या उत्पादित वस्तूंचे परदेशात निर्यात करण्याचे नियोजन करणार. अशा प्रकारचा वचननामा प्रभाकर साळवे यांनी ५०० रुपयाच्या स्टँप पेपर वर जामनेर मतदार संघातील जनतेसाठी लिहून दिला आहे. त्यामुळे जनतेने मलाच निवडूण द्यावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
*राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार साळवे यांनी चक्क ५०० रुपयाच्या स्टँप पेपर वर वचननामा केला जाहीर.*

+ There are no comments
Add yours