जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील पहूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या समर्थनार्थ प्रचार सभा दि.९ रोजी पहूर पेठ येथील आठवडे बाजाराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांचे झंझावाती भाषण झाले. यावेळी बोलतांना नाथाभाऊ म्हणाले तुमच्या जामनेर तालुक्यातील विविध धरणे, पाझर तलाव कोणी मंजूर केली नाथाभाऊंनी भागपूर सारखा प्रकल्प १९९८ मध्ये मी मंत्री असतांना मंजूरी मिळाली होती. जवळपास २४ वर्ष झाली तरी हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आणि आता तुमचे आमदार सांगताय भागपुरचे पाणी पाईप लाईन द्वारे तुम्हाला देऊ २४ वर्षाच्या कालखंडा मध्ये तुमच्या पर्यंत पाणी कधीच येऊन गेले असते.माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची इंचन इंच जमीन ओलिताखाली आणण्याचे आश्वासन दिले होते. किती जमीन ओलिताखाली आली. हेच मंत्री महोदय कापसाला ७ हजार रुपये भाव मिळावा म्हणून उपोषणाला बसले होते. त्यांचे उपोषण मीच सोडवले होते. मग आता त्यांचेच सरकार असतांना व मोठ्या खात्याचे मंत्री असतांना देखील शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला ६ हजार रुपये भाव मिळतोय मग ते या विषयावर का भाष्य करत नाहीत. सोयाबीनला आज भाव मिळतोय ४ हजार रुपये १० वर्षापूर्वी भाव मिळत होता ६ हजार रुपये प्रचंड महागाई वाढलेली असतांना हे महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या विषयावर बोलायला तयार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागते तिथे आपले काय.एकीकडे लाडक्या बहिणींना १५०० रुपये द्यायचे आणि दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढवायचे हे कोणते धोरण राबविले जात आहेत. तुमचा आमदार माझ्याच शाळेत शिकून मोठा झाला आहे. आणि आता मीच सांगतोय यांना घरी बसवा आणि निष्कलंक, शांत सुस्वभावी असलेल्या शिक्षकाला म्हणजेच महाविकास आघाडीच्या दिलीप खोडपे सरांना निवडून आणा असे आवाहन नाथाभाऊंनी पहूर येथील प्रचार सभे मध्ये प्रचंड संखेने जमलेल्या जनसमुदायाला केले.यावेळी उमेदवार दिलीप खोडपे सर, संजय सावंत स्टार प्रचारक कविता म्हात्रे (माळी), पारस ललवाणी, डी के दादा पाटील,किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. मनोहर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

+ There are no comments
Add yours