जामनेर प्रतिनिधी):- सौ.साधनाताई महाजन यांचा ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या आधी राजकारणात प्रवेश झाला ,तो जिल्हा परीषदेच्या सदस्यपदापासून, सलग तिन वेळा त्या जि.प.सदस्या राहील्या. जामनेर नगरपरिषद झाल्यानंतर नगरसेविका व नंतर नगराध्यक्षा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम पाहत आहे. आज त्यांचा वाढदिवस असतांनाही त्या लोहरा कुऱ्हाड गटात प्रचारात सक्रीय सहभागी झाल्या असल्याचे दिसून आले. लोहारा येथे महीला कार्यकर्त्यांच्या उपस्थीतीत त्यांच्या वाढदिवसचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यांच्या नगराध्यक्षांच्या कारकिर्दीत गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रेरणेने जामनेर शहरासह तालुक्याचा ख-या अर्थाने विकास दृष्टीक्षेपात पडतांना दिसून येत आहे.गिरीशभाऊंवर पक्षाच्या मोठ्या जबाबदा-या नेहमी असतात व ते लिलया पार पाडतात .पक्ष असो किंवा सरकार यांच्या वर येणा-या संकटाशी निधड्या छातीने व त्यांच्यात असलेल्या खेळाडू वृत्तीने सामोरे जातात,म्हणून त्यांना महाराष्ट्रभर संकटमोचक या नावाने ओळखले जाते.
प्रत्येकाच्या सुख- दुखा:त भाऊ एकरूप होतात, तश्याच साधनाताई सुद्धा सुख दुःखात सहभागी होत असतात, भाऊ जेव्हा मतदार संघात नसतात तेव्हा सर्वस्वी जबाबदारी साधनाताई व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या खांद्यावर घेत असतात या सोबतच त्यांना साथ मिळते ती त्यांच्या दोन्ही मुलींची आणि जावयांची ते सुद्धा गिरीश भाऊंच्या प्रचाराची धुरा सांभाळतांना दिसून येत आहेत.साधनाताईं कडे कोणताही कार्यकर्ता काही समस्या घेऊन गेला ,तर त्या समस्येच निराकारण त्या शंभर टक्के करतात, तालुक्यात होणारे लग्नसमारंभ , साखरपुडे कौटुंबिक कार्यक्रम किंवा कुठे मौत झालेली असेल एखाद्या कार्यकर्त्याने फोन करून निरोप दिला व साधनाताई गेल्या नाही असे कधीच घडत नाही.प्रत्येक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात ,ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी ही त्या नेहमी हितगुज करताना दिसून येतात.भाऊंची दुरदृष्टी व कामांचा धडाका पाहता जामनेर मतदारसंघात आज रोजी हजारो कोटींचे विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे गिरीश भाऊंचा ७ व्यांदा विजयाचा रथ कोणीही रोखू शकणार नाही यात दुमत नाही.

+ There are no comments
Add yours