जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील पाळधी येथे दि. ७ रोजी संध्या .६ वाजता येथील शेतकरी किशोर परदेशी हे आपल्या शेतातील वेचलेला कापूस ट्रॅक्टरने घराकडे घेऊन येत असतांना जळगाव – छत्रपती संभाजी नगर हायवे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ चालत्या ट्रॅक्टर मधून अचानक धूर निघत असल्याचे बघत असतानाच ट्रॅक्टर पुलाच्या खाली पलटी होऊन ७ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की,जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील किशोर दलसिंग परदेशी यांच्या शेतात कापूस वेचून ट्रॅक्टर क्रमांक MH19 CU1694 यामध्ये ५ क्विंटल कापूस घेऊन किशोर परदेशी वय ३७, स्वाती परदेशी वय ३२, योगिता परदेशी वय १८, पूजा परदेशी वय १६, आरती परदेशी वय १६, हिराबाई परदेशी वय ३५ व वैशाली धनगर वय २५ हे घराकडे येत असताना जळगाव – छत्रपती संभाजी नगर हायवे रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंप जवळ ट्रॅक्टर मधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर पुलाच्या खाली पलटी झाले यावेळी ट्रॅक्टर मधील सर्व ७ जण हे जखमी झाले आहेत .त्यांना पुढील उपचारासाठी गावातील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.तर ट्रॅक्टर व ५ क्विंटल कापूस जळून खाक झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची माहिती पाळधी गावात पसरताच गावातील गणेश माळी,रवींद्र परदेशी,सागर परदेशी, पवण परदेशी,आकाश परदेशी, ग्रा.प.सदस्य देवचंद परदेशी, दिपक परदेशी,पन्नालाल परदेशी,शालिक परदेशी,कैलास परदेशी व मित्र परिवार यांनी ट्रॅक्टरची आग विझविण्यात मदत करत जखमींना रुग्णालयात हलविण्यात सहकार्य केले.
+ There are no comments
Add yours