पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेरात जिजाऊ रथयात्रेचे जंगी स्वागत.
जामनेर (प्रतिनिधी):- जिजाऊ रथयात्रेचे शहरात आगमन होताच महाराणा प्रताप चौकापासून मिरवणूक सुरू करण्यात आली. यात भजनी मंडळ, महिला भगिनी, सर्व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी शहरातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झालेले होते. जिजाऊंच्या वेशभूषेत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येकाच्या हातात विचार संदेश असलेले पोस्टर होते. जय जिजाऊ जय शिवराय व सर्व महा मानवांचा जयघोष चालू होता. ठीक ठिकाणी जिजाऊ रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. जिजाऊ रथयात्रा राजमाता जिजाऊ चौकात आल्यानंतर शिवसृष्टीवर शिवरायांना अभिवादन करण्यात आले. विचार पिठावर सर्व बहुजन महामानवांना अभिवादन करण्यात आले. जिजाऊ रथयात्रेचे प्रमुख सौरव खेडेकर, प्रा.अर्जुन तनपुरे, उमाकांत उफाडे, सुरेश पाटील,सुरेंद्र पाटील,अनिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष दीपक ढोणी पाटील यांनी केले. पुढे जिजाऊ रथयात्रा प्रमुख सौरव खेडेकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, सर्वांनी जातीपातीच्या चौकटी बाहेर पडणे आवश्यक आहे.


मराठा हा शब्द जातीवाचक नसून पंजाब ,सिंध ,गुजरात ,मराठा , महाराष्ट्रात राहतो तो मराठा. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक जीव मराठा आहे. हे मराठा सेवा संघाची स्थापनेपासून ची व्याख्या आहे. आम्ही नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेतून सर्वांना सोबत घेऊन काम करतो आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आरक्षणाचा विषय गंभीर असला तरी नोकऱ्यांच्या अभावी तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे त्यांनी सांगितले. आपल्या कुटुंबात संवाद नसल्यामुळे नको असलेले अनेक प्रकार घडत आहेत. मुला मुलींचे लग्न होत नाहीत ,झालेले लग्न टिकत नाहीत म्हणून कुठेतरी कुटुंबात सुसंवाद असायला हवा.सर्वांनी विचार जागरण करण्याचा पुन्हा प्रयत्न करायला हवा. चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे होत असलेले विकृतीकरण यावरही त्यांनी प्रकाश टाकला. औरंगजेब ची कबर हा मराठ्यांचा पराक्रमाची निशाणी आहे. तो त्यांनी केलेला पराक्रमाचा पुरावा आहे. म्हणून कबरीचे राजकारण करू नये. महापुरुषांचे होत असलेले दैवतीकरण हे चुकीचे असून संभाजी राजेच्या नावाने करत असलेले उपास तपास करण्यापेक्षा तरुणांनी संभाजी राजेंचे चरित्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. महामानवांची होत असलेली बदनामी व दंगलीचे कटकारस्थान हाणून पाडा,सर्वांनी एकत्र या असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
शहरातील महाराणा प्रताप चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वसंतरावजी नाईक चौक तसेच तालुक्यातील वाडी-नवीदाभाडी, टाकळी,पळासखेडा बुद्रुक, केकत निंभोरा, चिंचखेडा बु,नेरी, या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी जिजाऊ रथयात्रेचे स्वागत केले.
यावेळी नगरपालिकेच्या प्रथम नागरिक सौ.साधनाताई महाजन,माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे सर,गटनेते डॉ. प्रशांत भोंडे,प्रा.शरद पाटील,चंद्रकांत बाविस्कर,जितेंद्र पाटील,कमलाकर पाटील, डॉ.प्रशात पाटील,नवलसिंग पाटील,उल्हास पाटील,शंकर मराठे,माधव चव्हाण,एस.टी.पाटील, प्रदीप गायके,नरेंद्र जंजाळ, मनोजकुमार महाले,डॉ.उमाकांत पाटील,डॉ.रमेश पाटील, डॉ.निलेश पाटील,डॉ.नरेश पाटील,डॉ.संदीप पाटील, डॉ.ईश्वर महाजन , अनिस पहेलवान यांच्या सह बहुसंख्य महिला बघिणी व बंधू हजर होते. अबू आला शेख यांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून पाच हजाराचा रोख शिवनिधी मराठा सेवा संघ परिवाराला दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक ढोणी,योगेश पाटील,अमोल पाटील,सुनील चौधरी,डॉ.प्रशांत पाटील,प्रा.ज्ञानेश्वर चिकटे,किशोर पाटील,प्रविण पाटील,दिपक वारंगणे,विनोद पाटील, डॉ.रविंद्र सुर्यवंशी,दशरथ पाटील,दिपक तुळशिराम पाटील,विशाल पाटील,योगेश काळे,प्रमोद पाटील,सुनील कानडजे,विनायक पाटील,नंदू पाटील,योगेश मानकर,सागर पाटील (भाचा), निलेश मराठे,गौरव काळे,पळासखेडा बु.येथे राजू खरे,विजय पाटील,नवीदाभाडी वाडी फाटा येथे सागर खवडे,उमेश वखरे,अमोल कोळी,गजानान बहुरूपे,गोपाळ पाटील,भास्कर खवडे,उत्तम गावंडे, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर खराटे,टाकळी बु चे गावकरी यांनी महाराणा प्रताप चौकात स्वागत केले.त्यामध्ये दिपक बावस्कर, शरद मोरे, व सर्व ग्रा.पं.सदस्य हस्ते…केकतनिंभोरा येथे निवृत्ती पाटील,अनिल शिंदे,अमोल पाटील,चिंचखेडा येथे कैलास पाटील,देविदास पाटील,अरूण पाटील,तुकाराम पाटील, ग्रामपंचायत चिंचखेडा,नेरी येथे प्रमोद नाना पाटील यांनी जनता हायस्कूल येथे यात्रेत येणाऱ्यांसाठी अल्पोपहार व शितपेयाची व्यवस्था केली.तसेच नेरी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले व रथयात्रा जळगाव कडे रवाना झाली.
+ There are no comments
Add yours