पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथे पार पडला शेतकरी मेळावा.
जामनेर (प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून राज्यातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाघूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत २७ गावांमध्ये २०२० शेततळे बांधण्यात येणार असून, त्यात वाघूर धरणाचे पाणी साठवले जाणार आहे. हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून, शाश्वत सिंचन सुविधेसोबत भूजल पातळी सुधारण्यास देखील मदत करेल.



प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि फायदे
1. शाश्वत सिंचन व्यवस्था
शेततळ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही पाणीपुरवठा उपलब्ध होईल. यामुळे पारंपरिक तसेच आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक आणि तुषार सिंचन) वापरणे शक्य होईल.
2. जलसंधारण आणि पाणीबचत
शेततळ्यातील पाणी ठिबक आणि तुषार सिंचनासाठी वापरल्यास पाण्याचा कार्यक्षम उपयोग होईल आणि जलसंधारणास चालना मिळेल.
3. शेती उत्पादनात वाढ
नियोजनबद्ध सिंचनामुळे शेतकरी वर्षभर विविध पिके घेऊ शकतील. परिणामी, उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढेल.
4. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
5. शेततळ्या मध्ये मत्स्य पालन केल्यास , शेती पुरक जोड धंदा ऊपलब्ध होईल.
व्यवसाय बळकट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल
वाघूर उपसा जलसिंचन योजनेचा विस्तार – वाघूर उपसा जलसिंचन योजना क्र. १ आणि २ सध्या कार्यान्वित असून, या योजनेतून १९,१३२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
योजनेअंतर्गत गाडेगाव, जामनेर आणि गारखेडा या तीन शाखांमधून १०,१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.२७ गावांमध्ये २,०२० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी २१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.सिंचनाला शाश्वत पर्याय म्हणून शेततळ्यांचे जाळे जामनेर विधानसभा मतदारसंघात सर्व दूर नेण्याचा जलसंपदा विभागाचा मानस आहे. त्यानुसार वाघुर उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ च्या लाभक्षेत्रात असंख्य शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ देण्यात येत आहे.या सर्व लाभधारक शेतकऱ्यांचा भव्य मेळावा आज जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथे संपन्न झाला. तापी पाटबंधारे विकास महामंडळ व मे. जि. व्ही. पी. आर. इंजिनीअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मेळाव्यास उपस्थित शेतकरी बांधवांसोबत ना.गिरीश महाजन यांनी संवाद साधला.यावेळी आ. श्री. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी तथा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours