*रक्तदानाच्या चळवळीचे १५ वर्ष पूर्ण, पाळधीच्या स्वराज्य ग्रुपचा स्तुत्य उपक्रम.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

पाळधीच्या स्वराज्य ग्रुपचा स्तुत्य उपक्रम.

 जामनेर (प्रतिनिधी):-  तालुक्यातील पाळधी येथील माजी सरपंच व भाजपचे अभ्यासू कार्यकरते कमलाकर पाटील यांनी स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून रक्तदानाची एक छोटीशी सुरुवात १५ वर्षांपूर्वी केली होती.आज मित्र परिवाराने व तरुण मित्रांनी रक्तदानाचे कार्य हाती घेत चळवळ करून टाकली. ह्या रक्तदानाच्या चळवळीमुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचलेत.यात कधीही खंड पडला नाही, २६ जानेवारी २५ हे रक्तदानाचे १५ वे वर्ष आणि यावर्षीही तोच उत्साह सर्व दात्यांमध्ये दिसून आला.

स्वराज्य ग्रुप पाळधी आयोजित प्रजासत्ताक दिनाचे औचित्य व स्व भैय्या पाटील स्मरणार्थ यावर्षीही १५१ दात्यांनी रक्तदान केले.रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे व परिश्रम घेणाऱ्या सर्व तरुण मित्रांचे आभार यावेळी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी मानले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours