पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
२० वर्षानंतर भरला स्नेहसंमेलनाचा मेळा.
चाळीसगाव (प्रतिनिधि):- तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे २००४ या शैक्षणिक वर्षातील दहावी बॅच च्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एल पी पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पी ए पवार सर, श्रीमती चंद्रकला पवार, श्रीमती सुरेखा पाटील, डी आर पाटील, ए आर सूर्यवंशी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदीप मगर, अमोल मगर, अमोल पगार, सुनील चौधरी, माधुरी पाटील, भाग्यश्री सरोदे, तृप्ती देशमुख, निलेश पवार, भूषण सूर्यवंशी, माधवराव पाटील ,गोरख कुंभार ,ज्ञानेश्वर पाटील आदी मित्र मैत्रिणींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पवार यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले, आभार प्रदर्शन श्रीमती भाग्यश्री सरोदे यांनी मानले कार्यक्रमांमध्ये मित्र मैत्रिणींनी आपले मनोगत व्यक्त केले.
+ There are no comments
Add yours