पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
जामनेर,पहूर असे नवीन २ सी सी आय केंद्र सुरु करण्याच्या मंत्री महाजन यांनी दिल्या सूचना.
जामनेर – निसर्गाच्या लहरीपणामुळे व बोगस बियाण्यामुळे आधीच शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात घट झाली आहे . त्यातच शासनाच्या उदासीन धोरणामुळे कापसाला अपेक्षीत हमीभाव मिळत नसला तरी डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी कापुस उत्पादक शेतकरी सी सीआयच्या खरेदी केंद्रावर आपला कापूस मिळेल त्या वाहनाने घेऊन जात आहेत.तसे तालुक्यात शेंदुर्णी आणि जामनेर असे दोन सी सी आय केंद्र सुरु झाले असून शेंदुर्णी मध्ये काही शेतकर्यांचा कापूस विक्री संदर्भात वाद निर्माण झाला होता.त्यामुळे तेथील सी सी आय केंद्र काही दिवसांपासून बंद झाल्याने जामनेरातील केंद्रावर गर्दी होतांना दिसून येत आहे.मराठवाड्याच्या तुलनेत तालुक्यातील कापूस मॉश्चर (ओलाई प्रमाण), आर डी या पॅरामीटर मध्ये बसत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी, जिनींग मालक, सी सी आय अधिकारी यांच्यात कापसाच्या ग्रेड बाबत खटके उडत असतात. त्यामुळे सी सी आय अधिकारी कापूस खरेदी करतांना घाबरत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही तालुक्यात ४ केंद्र सूरू झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.कापूस मोजणीसाठी जाण्यापुर्वी जामनेर बाजार समितीच्या आवारात कापसाच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून जवळ पास ८० ते १०० वाहने उभी आहेत.बऱ्याच शेतकऱ्यांनी भाड्याचे वाहन लावून आपला कापूस येथे आणला आहे त्यामुळे अतिरीक्त भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.उत्पादन कमी, उत्पादन खर्च , मजूरी अधीक, त्यातच शासनाचा हमीभाव कमी आणि आता कापूस विकतांना २ ते ४ दिवस लागत असल्याने वाहनांचे लागणारे अतिरिक्त भाडे या सर्व बाबी बघता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नसल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडलेला असल्याचे दिसून येते.

बळीराजाची व्यथा राज्याचे संकट मोचक ना.गिरीश भाऊ महाजन यांच्या पर्यंत पोहचल्या असून त्यांनी बाजार समितीचे सभापती, संचालक, सचिव,सी सी आय अधिकारी व जीनिंग मालक यांच्याशी कापूस खरेदी बाबत चर्चा करुण तालुक्यात अजून २ सी सी आय केंद्र सुरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी स्वप्नील दडमल(सीसीआय महाप्रबंधक) यांना दिल्या असल्याचे सूत्रांकडून समजते.वरीष्ठस्थरावर याबाबत कार्यवाही सूरू झाली असून लवकरच जामनेरात अजून एक व तालुक्यातील पहूर येथे एक असे दोन सी सी आय केंद्र सूरू करण्यात येणार असल्याची माहिती जामनेर बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तूत प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. तसेच शेंदुर्णी येथील सी सी आय केंद्र सुद्धा पूर्ववत सुरू होणार असून तालुक्यातील शेतकरी पाहिजे त्या केंद्रांवर आपला कापूस विक्री साठी घेऊन जाऊ शकतात.अशी माहिती जामनेर बाजार समिती मधून मिळाली आहे.
+ There are no comments
Add yours