*मी गिरीश दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की…*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

गिरीश भाऊ महाजन यांची ३.० टर्म सूरू 

जामनेर – आज दी.१५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर मध्ये पार पडला असून जळगांव जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व संकटमोचक मा. ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा कॅबीनेट मंत्रीपदाची माळ पडली आहे.जळगांव जिल्ह्यासह जामनेरातील राजमाता जिजाऊ चौकात शपथ विधीचे लाईव्ह प्रक्षेपण प्लेगजी टी व्ही वर दाखवण्यात आले होते.ना.महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेताच यावेळी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत व डी जे च्या गाण्यावर थिरकत मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

गेल्या २०१४ पासून महायुतीच्या सरकार मध्ये ना. महाजन यांनी वजनदार मंत्री पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळून पक्षावर व सरकारवर आलेले कोणतेही संकट लीलया पेलवून आपल्या कामाची चूनुक दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांना आता तिसऱ्यांदा मंत्री पदाची संधी मिळाली आहे.मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे व विश्वासू म्हणून ना. महाजन यांच्याकडे बघीतले जाते. मंत्री पदाची त्यांची ३ री टर्म असून जामनेर तालुक्यात सूरू असलेली विकासाची गंगा जोमाने सुरू होईल यात कोणतीही शंका नाही. यावेळी आनंद उत्सव साजरा करतांना जा. ता. एजु. चे सचिव जितेंद्र पाटील, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, स्विय सहाय्यक दिपक तायडे, सिनेट सदस्य दिपक पाटील,माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावीस्कर, प्रा.शरद पाटील,गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, माजी नगरसेवक अतिष झाल्टे, बाबूराव आण्णा हिवराळे, सुहास पाटील, उल्हास पाटील, सुधाकर माळी, डॉ.संजीव पाटील,विलास हिवराळे , पिंटू चिप्पड, जालमसिंग राजपूत , पप्पू पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजमाता जिजाऊ चौकात उपस्थित होते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours