पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
जामनेर तहसीलदार यांना निवेदन सादर.
जामनेर – येथील तहसील कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काडून निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमांमधून निदर्शनास येते. बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशाप्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणा-या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी व अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदु आपल्या सोबत ठामपणाने आहोत.

प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही आपल्या हे नजरेस आणत आहोत की, अशाप्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समूदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समूदाय याची दखल घेत आहे. बांगलादेशात झालेल्या हया धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि ह्या घटनांमूळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते. अशा आशयाचे निवेदन जामनेरात सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी श्याम चैतन्य बापू यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला संबोधित केले.
निवेदन देतेवेळी श्याम चैतन्य बापू, अँड.प्रमोद सोनार, शंभुशेट झवर, नानुशेठ शहा, सचिन गायकवाड ,चंद्रकांत रामधन बाविस्कर, महेंद्र बावीस्कर,कल्पेश भावसार,सौ.अंजूताई पवार ,सौ.आरती देशपांडे,सौ.गौरी लंगरे, कर्ण बारी, अदित्य देवरे, चेतन नेमाडे, जयवंत पर्वते , राणाजी महाराज, शुभम माळी, धनंजय माळी, रविंद्र झाल्टे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours