*जामनेरपुरा येथील गरीब कुटुंबाचे घर आगीत  उध्वस्त.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

देवाहाऱ्यातील दिव्यामुळे आग लागल्याचा  संशय.

  जामनेर – येथील शास्त्री नगर भागातील रहिवासी खुशालसिंग दावलसिंग पवार हे  उत्कृष्ट स्वयंपाकी असून परिसरात लग्न समारंभ, छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या ऑडर त्यांना मिळत असतात.  याच व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा रहाटगाडा व्यवस्थित सुरू होता.मात्र नियतीच्या चक्रव्युहात अडकल्याने घरात लागलेल्या आगीत त्यांचा संसार उध्वस्त झाला आहे.तसे त्यांचे कुटुंब धार्मिक प्ररुत्तीचे असल्याने  दी.३० रोजी सकाळीच देव्हाऱ्यात धार्मिक विधी आटोपून ते पत्नीसह स्वयंपाकाची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी घराला कुलूप लावून गेले असता बंद घरातील देव्हाऱ्यात लावलेल्या दिव्यामुळे घराला अचानक आग लागली. यात घरातील टिव्ही , फ्रीज यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.अचानक लागलेल्या आगीमुळे आजू बाजूच्या रहिवाश्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनी या घटनेची माहिती जामनेर नगर पालिकेच्या अग्नीशामक दलाला दिली. वेळीच गॅस सिलेंडर बाहेर काढल्यामुळे  मोठा अनर्थ टळला. आजू बाजूला दाट वस्ती असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून अग्नीशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.अग्नीशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. खुशालसिंग पवार यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून  खुशालसिंग पवार यांचे लाखोंचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. झालेल्या नुकसानी बाबत शास्त्री नगर मधील  रहिवाश्यांनी  हळहळ व्यक्त केली असून शासनाच्या वतीने त्यांना मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours