EVM बाबत सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केल्या.
जामनेर (प्रतिनिधी):- मतदार संघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार दिलीप खोडपे सर यांनी पत्रकार परिषदेत EVM मशीन बाबत शंका उपस्थित केली असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हरल्याचा खळबळ जनक आरोप केला आहे. ते बोलतांना म्हणाले की, आम्ही ज्या गावात प्रचाराला गेलो तिथली जनता अगदी तन मन धनाने आमच्या सोबत असल्याचे दिसून येत होते. एवढी प्रचंड गर्दी आणि सपोर्ट आम्हाला मिळतांना दिसत असताना असे काय घडले की, मतदार अचानक पिरले आणि आमच्या विरोधात मतांचा कौल गेला. त्यामुळे येथे EVM मशीन बाबत शंका घेण्यास वाव मिळताना दिसून येतो. दुसरे पराभवाचे कारण सांगताना त्यांनी सांगितले की, प्रचंड पैश्यांचा वापर या निवडणुकीत आमचा पराभव करण्यासाठी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे एकच म्हणावेसे वाटते की, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हारली आहे असे ते शेवटी म्हणाले.

@याच वेळी डी के पाटील यांनी सुद्धा EVM बाबत शंका उपस्थित केली असून त्यांनी सांगितले की, लाडकी बहीण ही एक योजना सोडली तर ईतर योजना जसे शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य भाव नाही,बेरोजगारीचा प्रश्न ,प्रचंड वाढलेली महागाई हे ज्वलंत प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेले असताना एवढा मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचा पराभव कसा होऊ शकतो त्यामुळे EVM बाबत शंका निर्माण झाली आहे.
@ तर माजी नगराध्यक्ष राजू बोहरा म्हणाले की, खोडपे सरांच्या विजयाचा शिल्पकार मी असेल असेच मला वाटत होते.मात्र मी स्वतः त्यांना विजयी करण्यात कमी पडलो असून त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहे. लाडक्या बहीणी बाबत थोडे लक्ष आपण दिले असते तर कदाचीत चित्र वेगळे राहीले असते. येणाऱ्या जि. प., पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला यश नीच्चित मिळेल त्यामुळे संघटन असेच ठेवण्याचा कान मंत्र त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला.
@ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील म्हणाले की, गेल्या सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. आता असे काय घडले की, सर्व निकाल महाविकास आघाडीच्या विरोधात गेले सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर, महागाई या बाबत वातावरण असताना कुठे तरी घोळ झाला असल्याची शंका येणे साहजिकच आहे.
@ राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी सुद्धा EVM बाबत शंका उपस्थित केली.
@ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील म्हणाले की, एका मुख्यमंत्री लेव्हल च्या व्यक्ती सोबत एका सर्वसामान्य शिक्षकाची ही लढाई होती. ईतर ठिकाणी जो निकाल भाजपच्या उमेदवारांच्या बाबतीत लागला तो फार मोठ्या फरकांचा होता.येथे फक्त आपण २६ हजार मतांच्या फरकांनी हरलो.शेवटच्या एका तासात झालेल्या ३६ हजार मतांनी आपल्या उमेदवाराचा घोळ केला साहजिकच हे जे मतदान झाले ते धनशक्ती मुळे झाले आणि तिथेच आपल्या उमेदवाराला फटका बसला. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांकडून EVM बाबत व धनशक्ती बाबत शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत.


+ There are no comments
Add yours