५ वाजेनंतर बूथ क्र.६२ मध्ये व मुस्लीम बहुल भागात लांबच लांब रांगा दिसून आल्या.
उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत झाले कैद.
जामनेर (प्रतिनिधी):- मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गिरीश भाऊ महाजन व महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्यात टक्कर होत असून कोण बाजी मारेल हे येणाऱ्या २३ तारखेला निकालाअंती दिसून येईल.शहरातील न्यू इंग्लिश स्कूल जामनेर येथे माजी मंत्री तथा उमेदवार गिरीश भाऊ महाजन, सौ. साधनाताई महाजन, ईश्वर बाबूजी जैन , मनीष जैन यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला असून खोडपे सर यांनी आपल्या परिवारासह नेरी येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. तर न्यू इंग्लिश स्कूल मध्येच व्हील चेअर वर येऊन एका महिलेने मतदानाचा हक्क बजवल्याचे यावेळी दिसून आले.

आज ४ वाजेपर्यंत मतांची टक्केवारी अतिशय कमी फक्त ४४ टक्के दिसून आली. संध्या.५ वाजेनंतर जामनेर शहरातील बूथ क्र.६२ मध्ये व मुस्लीम बहुल भागात मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्याने मतदान प्रक्रिया हि रात्री उशीरा पर्यंत सूरू होती.
एकंदरीतच जामनेर तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठेही अनुचीत प्रकार दिसून आला नाही. मात्र काही मतदारांचे नाव मतदार यादीत सापडत नसल्याने त्यांना मतदान न करताच परत जावे लागले त्यांचा भ्रमनिरास झाला.
सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत झालेले मतदान
पुरुष- १०२५५०, स्त्री- ९५९५५ , एकूण- १९८४०५, टक्केवारी- ५९.१८ % मतदान झाले असून शेवटची टक्केवारी हाथी येणे बाकी असल्याने मतांची टक्केवारी ६७ टक्के पर्यंत जाईल असा प्राथमिक अंदाज सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आला आहे. झालेल्या मतदानावरून प्रमूख लढत होत असलेल्या दोन्ही उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.
माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन (महायुती उमेदवार ) – मतदान करतांना जामनेर शहरासह संपुर्ण मतदारसंघात व महाराष्ट्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार स्थापन होणार असून जामनेर मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे. अशी प्रतिक्रिया गिरीश भाऊ महाजन यांनी दिली आहे.

तर
दिलीप खोडपे सर (महाविकास आघाडी उमेदवार) – महाविकास आघाडीच्या प्रतेक पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी जितोड मेहनत करून निस्वार्थ पणे ही निवडणूक अक्षरशः डोक्यावर घेतल्याने व मतदारांसह कार्यकर्त्यानी तन मन धनाने मला विजयी करण्यासाठी प्रयत्न केल्याने आपला जामनेर मतदार संघातून किती मतांनी विजयी होईल हे सांगू शकत नाही. मात्र माझा विजय निश्चित होईल. अशी खोडपे सरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यामुळे विजय नक्की कोणाचा होईल हे २३ तारखेलाच निकालातून दिसून येईल .
+ There are no comments
Add yours