*गिरीश भाऊ महाजन यांनी शिक्षण संस्था ताब्यात घेण्यासाठी दबाव तंत्राचा केला वापर – पारस ललवाणी *

गेल्या ३० वर्षात यांनी कोणता विकास केला ते सांगावे.

जामनेर (प्रतिनिधी):- विधानसभेचा रणसंग्राम आता अंतीम टप्प्यात आला असून महाविकास आघाडी कडून माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या कडून महायुतीचे उमेदवार गिरीश महाजन यांच्यावर आज दी.१३ रोजी पाचोरा रोड येथे संध्या.७ वाजता आयोजीत पत्रकार परिषदेत घणाघाती प्रखर टीका करण्यात आली. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांचा ३० वर्षाचा हिशोब बाहेर काढला. यावेळी बोलतांना ते म्हणाले तुमच्या आमच्या जामनेरची जा.ता.एजु.संस्थेमुळे खरी ओळख निर्माण झाली होती ती शिक्षणाची पंढरी म्हणून मात्र माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांना ती संस्था ताब्यात घ्यायची असल्याने त्यात त्यांनी दबाव तंत्राचा व आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करून बोगस चेंज रिपोर्ट तयार करून सुरेश धारीवाल यांच्यावर खोटा गून्हा दाखल केला. सुरेश शेट यांच्या बापाने , बाकडा कंपनीने यांना सपोर्ट करुन आमदार केले. त्यांच्याच मुलाला खोट्या गुन्ह्याखली यांनी यावेळी जेल मध्ये टाकले असे अनेक खोटे गुन्हे त्यांनी संस्थेच्या डायरेक्टरवर व आमच्यावर दाखल केले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल जामनेर या शाळेत ११ वी,१२ वी मध्ये शिक्षण घेण्यासाठी दुरून दुरून विद्यार्थी जामनेरात येत होते.आज त्या शाळेत राजकिय हस्तक्षेप झाल्या मुळे काय अवस्था झाली आहे. याबाबत तूम्ही जनतेला विचारा. ३० वर्षात यांनी कोणता विकास केला ते जनतेला यांनी दाखवले पाहिजे, रस्ते गटारी हे तर कोणताही नगराध्यक्ष असता तरी शहरात झाले असते. भूलथापा मारण्याचे काम यांनी ३० वर्षापासून केले आहे.शेतकऱ्यांच्या माला विषयी,बेरोजगारांच्या, टपरी धारकांच्या, कापसाच्या, एम आय डी सी बाबत व वाढती महागाई या विषयावर हे बोलायला तयार नाहीत. एक उद्योग यांनी ३० वर्षात तालुक्यात उभा केला नाही. आणि जो स्टार्च फॅक्टरी चा उद्योग उभा होता त्याचा मालक यांच्या त्रासाला कंटाळून पळून गेला आहे.आणि तरीही म्हणतात मी एक लाख मताधिक्याने निवडून येईल. कोठून येतो एवढा आत्मविश्वास प्रत्येक वेळी महाजन यांनी लोकांच्या भावनेशी खेळ केला आहे. ३० वर्षात यांनी पहूरच्या जनतेला पाणी दिले नाही .आणि आता म्हणता भागपुरचे पाणी देऊ . छातीवर हात ठेऊन यांनी सांगावे तालुक्यातील किती लोकांना यांनी नोकऱ्या दिल्या आहेत. आम्ही तरी काही लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत आता ते आमचे ऐकत नाही हा भाग वेगळा.टेक्सटाईल पार्क बाबत यांनी जामनेर च्या जनतेला आश्वासन दिले होते.त्याचे काय झाले या बाबत गिरीश भाऊ बोलायला तयार नाहीत.अशा अनेक विषयाला पारस ललवाणी यांनी हात घातला असून आता जनताच यांना घरी बसवणार असल्याच्या भावना त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours