पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेर साखर कारखान्यांच्या जागेवर इलेक्ट्रीसिटी (विज) प्रोजेक्ट उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन – राजू शेट बोहरा.
कारखाना विक्री करणे हा शेवटचा पर्याय.
जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील गोंडखेड येथे गेल्या ३५ वर्षांपासून सहकारी तत्वावर उभारण्यात आलेला साखर कारखाना आज पर्यंत बंद अवस्थेत आहे.माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल व त्यातून तालुक्याचा विकास होईल या उदात्त हेतूने साखर कारखान्याची उभारणी केली होती. मात्र कारखान्याला ३५ वर्ष होऊन सुद्धा आज पर्यंत सुरू होऊ शकला नाही.बंद असलेल्या या कारखान्याचे काही दिवस ईश्वरलाल जैन(बाबूजी )हे या संस्थेचे चेअरमन होते. गेल्या १०,१२ वर्षांपासून सुभाष चंपालाल बोहरा (राजू सेट बोहरा) हे या आज पर्यंत सुरू न झालेल्या कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी या महिन्यात दुसऱ्यांदा कारखाण्या बाबत मिटिंग बोलावली होती. यावेळी ते बोलतांना म्हणाले की, कारखान्या बाबत दोन पर्याय आपल्या समोर आहेत. त्यातील पहिला पर्याय साखर कारखाना किंवा इतर उद्योग त्या जागेवर सुरू करणे किंवा शेवटचा पर्याय म्हणजे कारखाना विक्रीस काढणे.कारखाना उभारणी करण्यासाठी जवळपास १२ कोटी रुपयांचे कर्ज लोकांचे आणि बँकेचे कारखान्यावर आहे. आणि जिल्हाभरातून ११ हजार लोकांचे शेअर्स कारखान्याकडे जमा आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून लोकांचे व बँकेचे पैसे कारखाण्यावर आहेत त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. जर या जागेवर इलेक्ट्रीसिटी प्रोजेक्ट सुरू केला तर त्यामाध्यमातून संस्थेला जवळपास ८५ हजार रुपये वर्षाकाठी भाडे मिळू शकते आणि भाडे करारावर घेणाऱ्या कंपनीकडून आपण ५ वर्षाचे भाडे डिपॉजीट स्वरूपात घेतल्यास साधारण ५ कोटी रुपये आपल्याकडे जमू शकतील आणि कारखान्यात असलेली मशीनरी एखाद्या कारखान्याला विक्री केल्यास त्यातून ३, ४ कोटी रुपये आल्यास ते पैसे बँकेला सरकारच्या मदतीने परत केल्यास व राज्य सरकारला विनंती केल्यास देणेदारांचे व शेर होल्डरचे पैसे परत करता येतील.व येणारे पुढील भाडे बँकेला व राज्य सरकारला व्याजासह परत करता येतील असे संस्थेमधील जानकार लोकांचे म्हणणे असून तसा प्रस्ताव आल्याचे राजू सेट यांनी यावेळी सांगितले. यासारखे प्रस्ताव विचाराधीन असून संस्था वाचवायची असेल तर तालुक्यातील राजकीय व अराजकीय लोकांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे ते यावेळी म्हणाले. कारखाना विक्री करणे हा शेवटचा उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून ज्यांच्या जमीनी कारखान्याने घेतल्या आहेत त्या जमीनी त्यांनाच परत घ्यायच्या असल्यास आजच्या बाजार भावाच्या हिशोबाने टेंडर काढून शासनाच्या नियमा प्रमाणे त्यांना खरेदी कराव्या लागतील हा शेवटचा पर्याय असल्याचे ते म्हणाले.शेवटी तालुक्याच्या विकासाचा विषय असल्याने काही कठोर निर्णय राजकीय दृष्टीकोनातून न बघता लोकहीतांसाठी घेणे आवश्यक असल्याचे राजू सेट बोहरा शेवटी म्हणाले. यावेळी कारखान्याच्या संचालक मंडळांसह शेतकरी, शेर होल्डर व तालुक्यातील जानकार मंडळी या वेळी उपस्थीत होते.
+ There are no comments
Add yours