*अखिल भारतीय कृषक संघटना जळगांव जिल्हाध्यक्ष पदी रावसाहेब पाटील यांची निवड.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंती दिनाचे होते औचीत्य.

 जामनेर (प्रतिनिधि):- दी.२७ डिसें. रोजी भारताचे पहिले दिवंगत कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म दिनानिमित्त अखिल भारतीय कृषक संघटनेच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी मननराज बिल्डरचे संचालक श्री रावसाहेब पाटील यांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर जळगांव जिल्ह्यात तळागाळा पर्यंत संघटनेची उभारणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख

यावेळी प्रथम भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.दिवंगत डॉ.पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब यांचा परिचय अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये नवोदित पदाधिकाऱ्यांना व उपस्थित जनसमुदायाना करून देण्यात आला. याच वेळी कृषी विभागात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यात जळगांव येथील मननराज बिल्डरचे संचालक रावसाहेब पाटील यांचाही सत्कार करून त्यांच्यावर जळगांव जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी प्रस्तूत प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. रावसाहेब पाटील यांचे जामनेर, जळगांव मध्ये हाऊस

डेव्हलपमेंडचे उल्लेखनीय कार्य असून या निवडीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या माध्यमातून सूरू झालेले हे संघटन संपूर्ण भारतात पसरले असून त्यामुळेच भारताला कृषिप्रधान देश म्हणून संभोदले जाते. महाराष्ट्रातील कृषक समाज (शेतकरी) या संघटनेत मोठ्या प्रमाणात सामील झालेला असून अजूनही होतांना दिसून येत आहे. 

डॉ.पंजाबराव देशमुख यांचा थोडक्यात मान्यवरांनी करून दिलेला परिचय व त्यांचे कार्य.

त्यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी पापळ जि.अमरावती या गावी झाला. समाजसेवा व राजकारण हा त्यांचा पेशा होता.उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.डॉ.पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू १० एप्रिल १९६५ रोजी दिल्ली येथे झाला आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours