*विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित ज्ञानगंगा विद्यालयात ८ वे बालसाहित्य संमेलन निवड फेरी संपन्न.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

 जामनेर – येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ व उच्च माध्यमिक विद्यालयात  दि.३ रोजी सकाळी १० वाजता विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव बाल साहित्य मंडळ पुरस्कृत ८ वे खान्देश स्तरीय कुमार साहित्य संमेलन निवड फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जामनेर तालुक्यातील १२ शाळांनी सहभाग नोंदवला.

 याप्रसंगी प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून शिक्षणाचे आराध्य दैवत सरस्वती मातेचे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले.प्रमुख पाहुणे मा.सचिन गायकवाड , स्वप्निल पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष मोरे उपस्थित होते.साहित्य संमेलन  निवड फेरीत मध्ये एकूण १२ शाळांनी सहभाग नोंदवला आणि १४५ बाल साहित्यिक विद्यार्थी सहभागी झाले होते .साहित्य प्रकारात काव्यवाचन,अभिवाचन, परिसंवाद,कथाकथन सादर झाले.परीक्षक म्हणून सौ.मोहिनी पाटील ,सौ.कांचन वानखेडे, श्रीमती सोनाली चौधरी, प्रदीप माळी सर यांनी  काम पाहिले.सर्व बाल साहित्यिक यांना संस्थेचे अध्यक्ष ना. गिरीश भाऊ महाजन ( माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या सचिव सौ.साधनाताई महाजन (माजी नगराध्यक्ष ) अँड.शिवाजी सोनार साहेब सर्व संचालक मंडळ,प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील तर प्रास्ताविक सचिन गायकवाड यांनी केले. संमेलन यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन योगेश बावस्कर यांनी व्यक्त केले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours